मित्रांनो!, बकरी ईदच्या निमित्ताने स्वतः सलमान खानने एक लिंक ट्विटरवर शेअर केली आहे. ज्यामध्ये सलमान खानचं लग्न झाल्याचा आणि त्याची दुबईत नूर नावाची पत्नी अन् १७ वर्षाची मुलगी असल्याचा दावा एका युझर ने केला आहे. यावर भडकलेल्या ‘भाईजान’ने त्याला चांगलंच सडेतोड उत्तर दिलंय. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान एकीकडे टायगर ३ या त्याच्या आगामी सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. तर दुसरीकडे अरबाज खान टॉक शो पिंचच्या दुसऱ्या सीजनच्या प्रीमियर एपिसोडमध्ये दिसला. पिंच २ मध्ये अरबाज खान सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या ट्विटवर गेस्टला प्रश्न विचारतात. यात काही ट्रोल्सचाही समावेश असतो. सलमान खानसोबत अरबाजने हेच केले.

एका ट्विटर युजरनं दावा केला की, सलमान खानचं लग्न झालं आहे आणि त्याची सीक्रेट फॅमिली दुबईत राहते. ज्यात त्याला १७ वर्षाची मुलगी आहे असं म्हटलं. त्यावर गेस्ट सलमान खाननंही मजेशीर उत्तर दिलं आहे. बकरी ईदच्या निमित्ताने सलमान खानने या एपिसोडची लिंक ट्विटरवर शेअर केली आहे. अरबाजने यावेळी सांगितले की, अधिकाधिक ट्विट पॉझिटिव्ह आहेत. परंतु काही ट्विट्स असे आहेत ज्यात अजब दावे करण्यात आले आहेत. एका युजरनं सलमान खानचं सीक्रेट लग्न झाल्याचा दावा केला आहे.

यूजरनं ट्विटमध्ये म्हटलंय की, कुठे लपून बसला आहे डरपोक, भारतात सर्वांना माहिती आहे दुबईमध्ये तुझी पत्नी नूर आणि १७ वर्षाची मुलगी आहे. भारताच्या लोकांना कधीपर्यंत मूर्ख बनवणार? हा दावा ऐकून सलमान खानही अवाक् झाला. हे कोणाबद्दल आहे असं सलमानने विचारलं तर अरबाज म्हणाला तुझ्याबद्दल लिहिलंय.

सलमान खान म्हणाला की, या लोकांकडे खूप माहिती आहे. हे बकवास आहे. मला माहिती नाही हे कुणाबद्दल बोलत आहेत. त्यांनी ही पोस्ट का केली? यावर मी काहीच बोलणार नाही असं पोस्ट करणाऱ्याला वाटतं का? असं सलमान म्हणाला.

तर माझी कुणीही पत्नी नाही. मी भारतात राहतो. ९ वर्षापासून गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. मी या माणसाच्या दाव्यावर काही बोलणार नाही. देशाला माहितीये मी कुठे राहतो. याचवेळी अरबाजने दुसऱ्या युजरचं ट्विट वाचून दाखवलं. त्यात लिहिलं होतं की, सलमान खानचं घर अय्याशीचा अड्डा आहे.

त्यावर सलमान म्हणाला तुम्ही माझ्या घरात असं काय पाहिलं ज्यामुळे माझं घर अय्याशीचा अड्डा वाटलं. पिंच २ चे अनेक प्रोमोज याआधीच आले आहेत. दुसऱ्या सीजनमध्ये अनन्या पांडे, टायगर श्रॉफ, फरहान अख्तर, कियारा अडवाणी, राजकुमार राव आणि फराह खानसह आयुष्मान खुराना पाहुणे म्हणून आले आहेत.