मित्रांनो!, बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार हा अतिशय शांत व्यक्तिमत्त्व असलेला म्हणून रसिक प्रेक्षकांना परिचित आहे.. सहसा त्याला कोणत्याही प्रकारच्या वादात कधीच पाहिले जात नाही, पण नुकताच अक्षय कुमार ने स्वतःहून खुलासा केलाय की, पूर्वीपासून तो राणी मुखर्जीवर खूप नाराज असून आजही तिच्यासोबत कोणताही चित्रपट करू इच्छित नाही.

जसे की आपण सर्वजण हे जाणतोच की, अक्षय कुमारने 1991 साली सौगंध या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता, जी लोकांना फारशी आवडली नव्हती. 1992 साली आलेला ‘खिलाडी’ हा थ्रीलर चित्रपट त्यांचा पहिला यशस्वी चित्रपट ठरला. 1993 हे वर्ष त्यांच्यासाठी चांगले नव्हते कारण त्यांचे बहुतेक चित्रपट फ्लॉप झाले होते.

या काळात राणी मुखर्जी यांनीही अक्षय कुमारसोबत काम करण्यास नकार दिला, त्यानंतर अक्षय कुमारने आजपर्यंत राणीबरोबर कोणताही चित्रपट केला नाही. असं म्हटलं जात आहे की अक्षय अजूनही यासाठी राणीचा रागराग करतो. चित्रपट ‘खिलाड़ियों का खिलाड़ी’ आणि ‘आवारा पागल दिवाना’ नंतर अक्षय राणी मुखर्जीचा द्वेष करु लागले.

अक्षय कुमार चित्रपट जगतात नवीन होते तेव्हाची ही वेळ आहे. वास्तविक, अक्षय कुमारला ‘खिलाड़ियों का खिलाड़ी’ चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती.  या सिनेमात त्यांची को स्टार राणी मुखर्जी कास्ट झाली होती, पण अक्षय कुमार या चित्रपटाचा हिरो असल्याचे राणी मुखर्जी यांना समजताच त्यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला.

त्यानंतर चित्रपट ‘आवारा पागल दिवाना’ या चित्रपटात अक्षय सोबत राणीला कास्ट केले होते, पण त्यानंतर राणीने हा चित्रपट देखील करण्यास नकार दिला. यानंतर मात्र अक्षय कुमारने राणीचा रागराग करायला सुरुवात केली.

नुकतेच करण जोहरच्या सुप्रसिद्ध चॅट शो कॉफी विथ करणमध्ये अक्षय कुमारची पत्नी, ट्विंकलने एक खुलासा केला की, “गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा राणी मुखर्जीने फिल्मी जगात आपले स्थान अजून निर्माण केले नव्हते” तेव्हा मी माझा ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट नाकारला आणि राणी मुखर्जीला दिला. ” होय, ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाची पहिली पसंती राणी मुखर्जी नसून ट्विंकल खन्ना ही होती.