बॉलिवूड अभिनेता गोविंदाने 90 च्या दशकात कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. गोविंदाची विनोदी शैली आणि नृत्य शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यावेळेस गोविंदा हा एकमेव अभिनेता होता जो तीन खानांपेक्षा खूप लोकप्रिय अभिनेता होता.

ना त्याच्याजवळ सलमान खानसारखी बॉडी किंवा शाहरुखसारखी रोमँटिक स्टाईल किंवा आमिर खानसारखा चॉकलेट बॉय सारखा चेहरा नव्हता, तरीही प्रेक्षकांना त्याची अभिनयाची शैली खूप आवडली.

गोविंदाचे वडीलही 40 च्या दशकात एक अभिनेता होते, त्यावेळी त्यांनी सुमारे 30 ते 40 चित्रपटांमध्ये काम केले होते आणि त्याची आई निर्मला देवी एक चांगली शास्त्रीय संगीत गायिका होती, तिने बर्‍याच चित्रपटांतही गाणे गायले होते.

एका चित्रपटामुळे गोविंदाच्या वडिलांना खूप नु’क’सा’न सहन करावे लागले होते, त्या चित्रपटाच्या फ्लॉ’प जाण्याने त्यांना त्यांचा बंगला विकावा लागला होता आणि त्यामुळे ते विरारमध्ये येऊन स्थायिक झाले, म्हणून गोविंदाला ‘विरार का छोरा’ असे म्हणतात. गोविंदा वाणिज्य विषयात पदवीधर झाला आणि नंतर नोकरीसाठी भ’ट’कं’ती करु लागला, पण त्याला नोकरी मिळाली नाही.

त्यानंतर 80 च्या दशकात एका जाहिरातीने गोविंदाचे आयुष्य बदलले. गोविंदाला अ‍ॅ’ल्वि’न नावाच्या कंपनीची जाहिरात मिळाली, त्यानंतर ‘तन-ब’द’न’ चित्रपटात नायक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यानंतर, गोविंदा ‘लव्ह 86’ मध्ये दिसला, हा चित्रपट हिट ठरला आणि गोविंदाने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात उत्तम प्रकारे केली. 90 च्या दशकापर्यंत प्रत्येकाच्या ओ’ठावर फक्त एकच नाव होते ते म्हणजे गोविंदा.

गोविंदा प्रेक्षकांची तसेच निर्माता-दिग्दर्शकांचीही पहिली पसंती होत होता. याच वेळी गोविंदा वर्षात 8-9 चित्रपट करत असे, त्यापैकी बहुतेक हि’ट ठरले. त्याची डायलॉग स्टाईल, डान्स, कॉ’मि’क टा’इ’मिं’ग, पं’च ला’इ’न या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना आवडल्या इतकेच नव्हे तर गोविंदाचे रंगीबेरंगी कपडेही त्याचे स्टाईल स्टेटमेंट ठरले. हे गोविंदाचे भाग्य होते, ज्यामुळे 1998 साली रिलीज झालेल्या ‘बड़े मियाँ छोटे मियाँ’ सारख्या चित्रपटाने बिग बी अमिताभ बच्चन पेक्षा गोविंदाला जास्त प्रसिद्धी मिळाली.

गोविंदाने आपल्या कारकीर्दीत ‘दीवाना मस्ताना’, ‘साजन चले ससुराल’, ’हीरो नंबर वन’, ‘हसीना मान जाएगी’, ‘कुली नंबर वन’, ‘ह’द कर दी आपने’, ‘शो’ला और श’ब’न’म’ असे अनेक सुपरहिट चित्रपट केले. त्याने आपल्या कारकीर्दीत सर्व प्रकारच्या प्रेक्षकांची खूप मन जिंकले.

गोविंदाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलले तर करिअरच्या सुरुवातीला जेव्हा गोविंदाने सुनीताशी लग्न केले, तेव्हा जवळजवळ एक वर्ष गोविंदाने आपल्या लग्नाबद्दल कोणालाही सांगितले नाही, कारण त्याला असे वाटत होते की या कारणामुळे त्याच्या लोकप्रियतेवर प’रि’णा’म होऊ शकतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.