तारक मेहता का उलटा चश्मा चे निर्माते असित मोदींनी दयाबेनच्या परतीवर दिली ही प्रतिक्रिया, पहा नेमकं काय म्हणाले असित मोदी?

गेल्या अनेक दिवसांपासून एकच चर्चा सिनेसृष्टीत रंगल्याची पहायला मिळते आहे. ती म्हणजे तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेतील दयाबेनची एन्ट्री कधी होणार? तब्बल गेल्या दोन वर्षांपासून ती या मालिकेत काम करताना पहायला मिळत नसल्याने या कार्यक्रमाची एक रौनक हरवल्याची कुठेतरी खंत रसिकप्रेक्षकांच्या मनावर वारंवार उमटत असल्याची पहायला मिळते आहे. अभिनेत्री दिशा वकानी जी दयाबेनच्या रूपात आजवर तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेत काम करत होती तिने सुरूवातीला पॅरेंटल लिव्हवर दोन आठवड्यांची सुट्टी घेऊन ती मालिकेतून विश्रांती घेताना पहायला मिळाली होती. परंतु त्यानंतर पुढे दोन आठवड्यांचे, दोन महिने आणि आता तर चक्क दोन वर्षे होऊन गेले तरी तिचा काही या मालिकेत पुन्हा येण्याचा कुठलाही लवलेश नाही. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दिशा वकानीच्या चाहत्यांकडून तिची मालिकेत पुन्हा एन्ट्री होणार असल्याची चर्चा बरीच रंगली होती. आणि चर्चांना आलेल्या उधाणामुळे अनेकांना थोडी आशा मिळाली होती. परंतु आतापर्यंत तरी तारक मेहताच्या टीमकडून तिच्या पुन्हा मालिकेत येण्याबाबत कुठलेही खुलासे झालेले नव्हते.

असं असताना आता चक्क मालिकेचे निर्माते स्वतः पुढे येत त्यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देत मोठा खुलासा केलेला पहायला मिळतो आहे. तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेच्या निर्माते असित कुमार मोदी हे आहेत, हे सर्वांना चांगलच ठाऊक आहे. अनेकदा ते स्वत:ची गेस्ट अपियरन्स हजेरीदेखील या मालिकेत लावतात. आज तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेत बरेच बदल झालेले पहायला मिळतात. लहानपणीच्या टप्पू सेनेतला कलाकार टप्पू असेल अथवा दुसरीकडे सोनू असेल किंवा तारक मेहतांची पत्नी अंजली असेल. जुन्या पात्रासाठी नवे कलाकार आल्याने चाहत्यांच्या पदरी थोडीशी निराशा पडणं साहजिकचं आहे, कारण जुन्या पात्रांची भुमिका निभावणाऱ्या कलाकाराची सवय झालेली असते. त्यात अशात दयाबेन या पात्राला दिशा वकानीने एका वेगळ्याच लहेजात आणि दमदार उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

मुळात तिने तिचं काम बखुबी चांगलच केलेलं आहे, पण आता या पात्रासाठी कलाकाराची भुमिका बदलणं निर्मात्यांनाही शक्य नसल्याचंच दिसून येत आहे. कारण दोन वर्षांमधे किमान एखादी व्यक्ती दिशा वकानीच्या ऐवजी उभी करता आली असतीदेखील परंतु तिने जे स्टॅंटर्ड सेट केले आहेत, ते दुसऱ्या कलाकाराकडून काढून घेणं तितकीशी सोप्पी बात नक्कीच नाहीये. त्यामुळे तारक मेहताची पुर्ण टिमचं अजुनदेखील दिशा वकानीच्या पुर्न आगमनाची वाट पाहते असल्याची पहायला मिळते. आणि आता सोशल मीडिया सोडून प्रसारमाध्यमांमधेही दिशाच्या परतीवर प्रश्न निर्माण होऊ लागले असताना शेवटी नाईलाजाने निर्माते असित कुमार मोदी यांनी या विषयावर स्पष्टपणे कबुली देऊन टाकल्याची पहायला मिळते आहे. असित कुमार म्हणाले की, जर दिशाला कायमचा हा कार्यक्रम सोडायचा असेल तर तिच्या निर्णयाच स्वागतचं असेल या तमाम प्रेक्षकांच्याशिवाय आम्हालाही तिची गरज अधिक प्रमाणात भासत आहे, आम्हीदेखील तिच्या पुन्हा येण्याची वाट पाहत आहोत.

कदाचित जर काहीच पर्याय शिल्लक राहिला नाही तर मलाच दयाबेन बनावं लागेल की काय? पुढे अशी मिश्किल प्रतिक्रियादेखील त्यांनी दिली. असित कुमार म्हणाले की, प्रेक्षकांनी सध्या दयाबेनची वापसी किंवा पोपटलालचं लग्न सोडून मालिकेच्या इतर गोष्टींकडे पहावं इतरही खुप गोष्टी आहेत ज्यामुळे कार्यक्रम व्यवस्थितरित्या चालू आहे. आणि सध्याच्या घडीला कोव्हिडच्या नियमांच पालन करत सारकाही पार पाडावं लागत आहे, तरीदेखील आम्ही रसिकप्रेक्षकांच्या मनोरंजनात कुठल्याही प्रकारचा अधिक खंड पडू देणार नाही असंही ते म्हणाले आहेत. नट्टू काका नुकतेच आजारातून सावरले आहेत, त्यांच्या वयामानानुसार त्यांनी अजून थोडा आराम करावा अशी ईच्छा आहे, योग्य वेळी त्यांना नक्कीच पुन्हा सेटवर बोलावल्या जाईल असंही असित कुमार मोदी म्हणाले आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!