बॉलीवुडमधील एक चांगलेच गाजलेले आणि प्रचंड लोकप्रिय अभिनेते म्हणून धर्मेंद्र यांची ओळख आहे. आज तमाम भारतीयांना त्यांनी सिनेमातून केलेल्या उत्कृष्ट कामांची निश्चितच जाण आहे. धर्मेंद्र यांच्या अभिनर कौशल्याला भारताच्या सिनेरसिकांनी अगदी मनापासून स्विकारलं, अर्थात त्यांनी त्यांच्या भुमिकांमधून छापच काहीशी बहारदाररित्या उमटवली होती.

आणि सध्याच्या घडली याच उत्कृष्ट अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीने म्हणजेच गायिका प्रकाश कौर यांनी एक गोष्ट मिडियात सांगितल्याची पहायला मिळतं आहे. प्रकाश कौर अर्थात धर्मेंद्रजींच्या पहिल्या पत्नी या पंजाबी सिनेसृष्टीतील चांगल्याच गोड गळ्याच्या गायिका होत्या, हे आज क्वचितच लोकांना माहित आहे. एका मुलाखतीदरम्यान प्रकाश म्हणाल्या की, त्यांच्या मनात धर्मेंद्र यांच्याबद्दल कायम आदरच आहे. त्या आजही त्यांनाच पती मानत आहेत. ते माझे पहिले आणि शेवटचेच प्रेम होते, मी आजही त्यांना आदर देते.

त्यांच्यापासून असलेली मुलंच माझ कुटुंब आहेत. प्रकाश कौर या धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या लग्नावर निश्चितच नाराज होत्या, त्या प्रचंड रागावल्या देखील होत्या, त्यांनी अनेकदा धर्मेंद्र यांच्यासोबत हेमा मालिनीच्या त्यांच्या प्रेमावरून भांडणदेखील केली होती.

अभिनेता धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे सिनेसृष्टीत काम करत असताना दोघांच प्रेमप्रकरण बराच काळ चर्चेत राहू लागलं होतं, खुप साऱ्या गोष्टींमुळे धर्मेंद्र यांच्या आयुष्यात आता हमखास हेमा मालिनी येणारच हे प्रकाश कौर यांच्या नजरेत स्पष्ट होऊ लागलं होतं, त्यांना या सगळ्या प्रकरणाची भिती वाटत होती. आणि नेमकं जे घडायला नव्हतं पाहिजे ते घडलं, हेमा मालिनी यांच्यासोबत धर्मेंद्र यांनी 1979 सालात लग्न केलं. प्रकाश कौर यांच्यापासून धर्मेंद्र यांना चार मुलं होती. आणि हेमाशी लग्न केल्यानंतर बरेच वाद मुलांच्या विषयावरूनही झाले होते.

प्रकाश कौर यांनी मुलाखत देताना धर्मेंद्र यांच्याविषयी एक खास बातही केली. ती म्हणजे, त्या म्हणाल्या धर्मेंद्र यांनी जरी हेमा मालिनी सोबत लग्न केलं असेल आणि आमच्या नात्याला नंतर अर्थ उरला नसेल तरीदेखील मला जिथे कधी एखाद्या मदतीची गरज पडेल तेव्हा अभिनेते धर्मेंद्र हक्काने त्यांची मदत निश्चितच करतील. त्यांचा स्वभाव अगदी चांगलाच आहे.

मी त्यांच्या केलेल्या चुकीमुळे त्यांच्यावरचा विश्वास गमावला आहे असं अजिबातच झालेलं नाही, त्यांच माझ नातं तुटलं तरी ते माझ्याच मुलांचे कायम वडील आहेत. प्रकाश कौर यांनी मुलाखतीत हेदेखील सांगितलं की, केवळ धर्मेंद्रचं काय तर त्या जागी कोणताही इतर दुसरा पुरूष असता तर त्यानेही हेमाला साहजिकचं पसंत केलं असतं. प्रकाश कौर यांनी पुढे हेदेखील म्हटलं आहे की, आजकाल एखादं अफेयर करून दुसरं लग्न करणारी ही इंडस्ट्रीच अशी झालेली आहे.

त्यामुळे त्या आता कोणत्याही कटूपणाची भावना मनात ठेवत नाहीत. प्रकाश कौर यांनी दिलेल्या सविस्तर मुलाखतीनंतर अनेकांना त्यांच्याबद्दल आदरच वाटला. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी असलेल्या प्रकाश कौर या बऱ्याचदा धर्मेंद्र आणि त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींसोबतही अनेकदा मिसळतातही. धर्मेंद्र यांच कुटुंब दोन पत्नी आणि इतर मुलाबाळांनमुळे अगदीच व्यापक झाल्याच पहायला मिळतं.

अभिनेते धर्मेंद्र यांनी आजवर हिंदी सिनेसृष्टीला अनेक चांगले सिनेमे दिले आहेतच शिवाय हेमा मालिनीच्या अभिनयाचीही जादू या हिंदी सिनेसृष्टीने अनुभवली आहे. जुन्या काळात हेमा आणि धर्मेंद्र यांच्या प्रेमाचे किस्से अगदी प्रचंड प्रमाणात सर्वत्र व्हायरलं झाले होते. पुढे चालून या दोघांची जोडी एकत्र पाहिल्यानेही काही रसिक फार आनंदित झालेले पहायला मिळाले होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!