खरतरं गोविंदा हे नाव जरी ऐकलं अथवा कानावर पडलं तरी मुळात आपल्या सर्वांनाच एक हरहुन्नरी, चपलाख, नृत्यात निपुण असा विनोदी अभिनेता सर्वप्रथम डोळ्यांसमोर उभा राहतो. गोविंदाने आजवर सिनेसृष्टीत बरीच चांगली कामगिरी करून ठेवली आहे. अनेक आजकालच्या अभिनेत्यांना त्याच्याइतपतं काही काम करणही एकवेळ अवघड ठरेल इतक्या सरस प्रतीचा आणि उत्कृष्ट दर्जाचा हा अभिनेता आहे.

गोविंदा आपल्याला बराचकाळ सोशल मीडिया आणि शक्यतो सिनेसृष्टी क्षेत्रापासूनही हल्ली लांब गेल्याचा पहायला मिळतो. त्याला कारणही तसचं काहीसं खास आहे. नाही म्हटलं तरी गोविंदासारख्या भन्नाट अभिनेत्यासोबत सिनेसृष्टीत काहीतरी चुकीचं नक्कीच घडलयं त्याशिवाय तो इतका खचून जाऊ शकतो, यावर विश्वास बसत नाही. अनेकदा मुलाखतीदरम्यान त्याने वारंवार सांगितलं की, कशा पद्धतीने त्याचे काही सिनेमे रिलीजच्या वाटेवर असूनही पडद्यावर येऊ दिले जात नव्हते; शिवाय त्याला येणारी कामेही अचानकपणे बंद झाली होती.

दरम्यान सिनेसृष्टीत त्याच्या बाबतीत जरी नाइंसाफी झाली असली तरी तो हल्ली त्याच्या स्वत:च्याच विश्वात बराचसा वावरताना पहायला मिळतो आहे. गोविंदाने दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला की, “पुर्वीचा गोविंदा आता राहिला नाही. मी हल्ली भ्रष्ट झालो आहे.

गोविंदा आता क’ठो’र झालायं, आधीचा गोविंदा फार पवित्र होता. मी आता दा’रू पितो, पा’र्ट्या’ही करतो. मला या इंडस्ट्रीने खुप बदलवलं आहे. मी ह’ल्ली केवळ व्यावसायिकदृष्ट्याच विचार करून चालतो.” गोविंदाच्या अशा या बोलण्याने बॉलीवुडमधील अनेकांना थोडासा ध’क्का बसलाच होता. परंतु त्याहीपेक्षा त्याच्या चाहत्यांना या गोष्टीचं दुख: झालं होतं. गोविंदासारख्या अभिनेत्यावर अशी काही वेळ येईल याचा कोणीच विचारही केला नसेल.

गोविंदाने दिलेली ही मुलाखत अगदी कमी वेळेतच सर्व सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून गेली. एकीकडे गोविंदा अगदी साधा आणि सहजतेत राहत असायचा आणि त्याच्यात एवढा कमालीचा बदल म्हणजे थोडसं वेगळं वाटणं साहजिकचं आहे. या मुलाखतीदरम्यान मुलाखत घेणाऱ्याने गोविंदाला असाही प्रश्न केला होता की, तू आधिपेक्षा ह’ल्ली देव अथवा आध्यात्याकडे जाताना पहायला मिळतो आहेस यावर गोविंदा थेट म्हणाला हे थोडसं उलट चित्र आहे; कारण गोविंदा आधी फार श्रद्धा ठेवणारा होता.

परंतु आता तो आध्यात्मापासून फारच दूर निघून आला आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे की, गोविंदाच्या एकापेक्षा एक सिनेमांनी आजवर रसिकप्रेक्षकांचं मनोरंजन किती तुफान प्रमाणात केलेलं आहे. अशात गोविंदासारख्या व्यक्तिमत्वाचीच काय तर अभिनय कौशल्याचीही सर एखाद्या अभिनेत्याला हल्लीच्या काळात येणार नाही, हे तितकचं खर आहे.

कुली नं 1, राजा बाबू, अंखियों से गो’ली मा’रे यांसारख्या कितीतरी दर्जेदार सिनेमांचा लेखाजोखा हा गोविंदाच्या नावावर आहे. फार क्व’चि’त लोकांना आठवत असेल पण गोविंदा काही काळासाठी राजकारणातही सक्रीय राहिल्याचं पहायला मिळालं होतं. तुमच्या खास माहितीसाठी सांगायचं झालंच तर 1999 मधे बीबीसी चॅनेलकडून घेण्यात आलेल्या स्पर्धेत गोविंदा जगभरातला 10 वा सुपरस्टार ठ’र’ला होता.

त्याकाळी जगभरात सुपरस्टारच्या यादीत नाव आलेला तो एकमेव भारतीय होता. गोविंदाने त्याच्या पदार्पणापासून पुढील चारही सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट दिले होते. ही खु’बी क्वचितच एखाद्या कलाकाराची पहायला मिळते. गोविंदा आता त्याच्या मुलीसोबत बऱ्याचदा इन्स्टाग्राम थोडाफार सक्रिय असल्याचही पहायला मिळतं.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!