होय मित्रांनो!, अत्यंत लोकप्रिय असलेल्या आणि करोडोंची फॅन फॉलोविंग असणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे एका चित्रपटाचे मानधन आहे तब्बल ५ कोटी आणि ती एकूण १५०० कोटींची मालकीण असून वयाच्या ३८ व्या वर्षीसुद्धा अजूनही सिंगलच आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री… चला तर जाणून घेऊ.

मित्रांनो!, बॉलीवूड मध्ये एक अभिनेत्री किंवा सिनेतारका बनून रसिक मनांवर राज्य करण्याचे प्रत्येक अभिनेत्रींचे स्वप्न असते. बॉलिवूड मध्ये प्रवेश केला कि, एक प्रसिद्ध अभिनेत्री व्हाव असं सगळ्यांना वाटत, आणि काहींना त्यामध्ये यश देखील मिळते.

इतकेच नव्हे तर काही अभिनेत्री बॉलीवूड मध्ये राज्य करुन, हॉलीवूडमध्ये जाऊन देखील नाव कमवत असलेल्या आपण बघत आहोत. प्रियांका चोप्रा, तब्बू, दीपिका हि काही त्यामधली नावं आहेत. मात्र एक अशी अभिनेत्री आहे, जिने बॉलिवूड मध्ये एकही सिनेमा नाही केला आणि तरीही ती, जगातील सर्वोत्तम अभिनेत्रींनपैकी एक आहे..

ही अभिनेत्री भारतीय आहे, मात्र बॉलिवूड मध्ये तिने काम नाही केले. मात्र तरी देखील जगभरात तिचे चाहते आहेत. तिने दक्षिणमधून आपल्या करियर ची सुरुवात केली आणि तिथेच सगळे सिनेमा केले. नागार्जुन आणि सोनू सूद सारख्या दिग्गज आणि सुपरस्टार कलाकारांसोबत तिने आपल्या करियरची सुरुवात केली.

तिने आपल्या कामाची सुरुवात २२व्या वर्षांच्या आसपास केली. मात्र, तिने कामाची सुरुवात केली आणि त्याच पहिल्या काही सिनेमामधून तिने आपल्या चाहत्यांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली. आपण बोलत आहोत ती बाहुबलीची देवसेना म्हणजेच अनुष्का शेट्टी आहे. सर्वात सुंदर आणि सर्वांच्या आवडीची अभिनेत्री…

साऊथ सिनेजगतात अनुष्काने सुरुवातीपासूनच आपले नाव कमवले आणि चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती. त्यामुळे ती आपल्या सिनेमा साठी चांगलाच मोठा चेक घेत असे. सर्वच सुपरस्टार अभिनेत्यासोबत तिचे काम नावाजले गेले होते. मात्र प्रभास सोबत तिची जोडी, बाहुबली सिनेमाच्या आधीपासून सर्वांच्या आवडीची होती आणि त्या सिनेमानंतर तर त्या दोघांच्या लग्नाच्या चर्चेला चांगलेच उधाणही आले होते…

पूरी जगन्नाथ ह्यांच्या ‘सुपर ‘ या सिनेमामधून अनुष्का शेट्टी ने आपल्या करियर ची सुरुवात केली. नागार्जुन, आयेशा टाकिया आणि सोनू सूद सारख्या स्टार कलाकारांसोबत तिने काम केले. त्यामुळे सुरुवातीपासूनच ती एक प्रसिद्ध आणि महागडी अभिनेत्री ठरली होती. “महानंदी” ह्या मोठ्या सिनेमामध्ये श्रीहरी आणि सुमंत या कलाकारांसोबत तिने काम केले. मात्र, ‘अरुंधती ‘ ह्या सिनेमाने तिला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले.

त्यानंतर तिने मागे वळून पहिलेच नाही. सध्याती एका सिनेमासाठी ५ कोटी रुपये घेते. नागार्जुन, महेश बाबू, प्रभास, अल्लू अर्जुन इ सारख्या मोठाल्या अभिनेत्यांसोबत अनुष्का ने काम केले आहे. मात्र , प्रभास सोबत तिची जोडी चाहत्यांना जास्त आवडू लागली होती. राजामौली ह्यांनी अनुष्काला आपल्या बाहुबली सिनेमामध्ये प्रभास सोबत घेण्याचे हे देखील एक मोठे कारण होते.

प्रभास सोबत तिची केमिस्ट्री बघता, त्या दोघांचे लग्न होणार अश्या चर्चा होत्या. त्याचबरोबर, नागार्जुन आणि तिच्या अफेअर च्या देखील चर्चा होत्या, सोबतच जजमेंटल है क्या सिनेमाच्या मेकर्स सोबत देखल ती विवाह करणार असल्याचे समोर येत होते. मात्र, आपण कोणासोबत ही रिलेशनशिपमध्ये नसल्याचे अनुष्काने सांगितले आहे. त्यामुळे ती अजूनही सिंगल आहे.