मित्रांनो! ही बॉलीवूड म्हणजे एक वेगळीच मायानगरी आहे. बॉलीवूडमध्ये प्रेमाचं नातं अनेक वेळा जुळतं आणि तेवढ्याच जास्त वेळा तुटतं देखील. इथे खूप कमी कलाकरांना आपल्या आयुष्याचा खरा लाईफपार्टनर मिळतो. मात्र, त्यातही असे काही घडते की, कलाकार आपल्या खऱ्या प्रेमाला ओळखू शकत नाही. आणि ज्या वेळी हे उमगते त्यावेळी मात्र वेळ हातातून निघून जाते. त्यानंतर, परत इतर कोणामध्ये तरी आपल्या खऱ्या प्रेमाला हे कलाकार शोधत राहतात.

अश्या वेळी ते कलाकार अनेकांसोबत संबंध प्रस्थपित करतात. यातूनच, त्याचे अनेकांसोबत नाव जोडले जाते. कधी कधी त्यांचे नाते नसले तरीही त्याचा गाजावाजा होतो, आणि यामध्ये त्यांच्या सामाजिक प्रतिमेचे नुकसान देखील होते. अशीच एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे की जिचे आजवर खरोखरच खूप अफेअर्स आणि रिलेशन्स निर्माण झाले आणि तुटलेही.

तिचे दुर्दैव हेच की, तिला कोणाचीच साथ अखेर पर्यंत मिळाली नाही आणि आज वयाच्या ५०व्या वर्षी देखील ती सिंगल आहे. या अभिनेत्रीने ‘इलू-इलू’ म्हणत त्याकाळात अक्षरशः लोकांना वेड लावलं होत. त्याचबरोबर तिच्यामधील, सुंदर अभिनयाने तिने आपला भलामोठा चाहतावर्ग कमवला होता.

सौदागर सिनेमा मधून, मनीषा कोईराला या नेपाळी सुंदरीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि अल्पावधीतच तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. १९४२ अ लव्हस्टोरी, बॉम्बे, अकेले हम अकेले तुम, दिल से सारख्या सुपरहिट सिनेमामध्ये तिने काम केले. ९० च्या दशकात तिने या देशातील तरुण मुलांना आपल्या सौंदर्याने वेडच लावले होते.

निरागस सौंदर्य आणि तेवढाच दमदार अभिनय यामुळे मनिषाचे केवळ बॉलीवूडमध्येच नाही तर साऊथमध्ये देखील अनेक फॅन्स होते. ज्याप्रकारे तिच्या करियरच्या चर्चा सुरु होत्या त्याचप्रकारे, पहिल्याच सिनेमापासून तिच्या अफेअरच्या देखील चर्चा रंगातच होत्या. आपल्या पहिल्याच सिनेमातील सहकलाकार विवेक मुशरन सोबत तिचे सर्वात पहिले अफेयर झाले.

तिच्या आणि त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र फार काळ या चर्चा टिकल्या नाही, कारण लवकरच मनीषाचे नाव नाना पाटेकर यांच्यासोबत जोडण्यात येऊ लागले. विशेष म्हणजे, खामोशी सिनेमामध्ये नाना पाटेकर यांनी मनीषाच्या वडिलांची भूमिका रेखाटली होती. पण अग्निसाक्षी सारख्या सिनेमामध्ये त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली होती, आणि त्यांचे प्रेमसुद्धा फुलत गेले.

मात्र एक दिवस मनिषाने, आयशा झुल्का आणि नाना या दोघांनाही एकसोबत पहिले, व तिने आपले नाते लगेच तोडले. नाना आणि मनीषाच्या लग्नाची देखील तयारी झाली होती असं बॉलीवूडमध्ये सांगितलं जातं. त्यानंतर मनीषाचेसुद्धा अनेक अफेअर झाले. डीजे हुसैन, नायजेरियन बिझनेसमॅन सेसिल ऍंथोनी, अभिनेता आर्यन वैद्य, प्रशांत चौधरी अश्या अनेक दिग्गज, सेलिब्रिटी व्यक्तींसोबत मनीषाचे अफेअर होते.

मात्र, यापैकी कोणासोबत देखील तिचा विवाह झाला नाही. अखेर तिने २०१० मध्ये नेपाळच्या मोठ्या उद्योगपती सम्राट दलाल यांच्यासोबत विवाह केला. मात्र, दोन वर्षाच्या आतच २०१२ मध्ये तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. यश, प्रसिद्धी, लोकप्रियता असं सर्व मनिषाने कमावलं. पण, प्रेमाच्या बाबतीत मात्र तिला कधीच यश नाही मिळालं म्हणून आजदेखील ती आपले आयुष्य एकाकीपणे जगत आहे.