अभिनेत्री ऐश्वर्या रायवर पुर्णत: फिदा होता अक्षय खन्ना, त्याने स्वत:च सांगितली होती ही खास गोष्ट!

बॉलिवुडमधील सिनेअभिनेत्री ऐश्वर्या राय म्हटलं तर साक्षात सौंदर्याच्या बाबतीत अगदीच अप्सराच म्हणावी लागेल. मिस वर्ल्ड ठरलेल्या ऐश्वर्यासारख्या अभिनेत्रीवर एखादा व्यक्ती कधी फिदा झाला नाही असं सहसा होऊच शकत नाही. ऐश्वर्या राय बद्दल म्हणालं तर तिची सर्वात जबरदस्त खासियत आहे ती तिचे निळ्या रंगाची देण लाभलेले डोळे. आणि तिला पाहिल्यावर सर्वप्रथम आपल्या नजरेत तेच डोळे अगदी घट्ट सामावून बसतात. शिवाय ऐश्वर्याच्या सौंदर्याला अगदी बहारदार साज चढतो तो तिच्या स्माईलने. आपल्यला लाभलेल्या सदाबहार सौंदर्याच्या जोरावर आजवर न जाणो ऐश्वर्याने किती जणांची ह्रदये घायाळ केली असतील. इतर काही असो परंतु यात एका अभिनेत्याच तर मन नक्कीच घायाळ झाल्याचं पहायला मिळालं होतं हे नक्की. तर हा अभिनेता म्हणजे, अक्षय खन्ना. अक्षय खन्ना त्याच्या दर्जेदार आणि विविधांगी पैंलूच्या अभिनयामुळे तो खास चर्चेत असतो. परंतु याव्यतिरिक्त म्हणालं तर त्याने एका खुलाशाने स्वत:कडे सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.

ऐश्वर्याला पाहताच एखाद्याच्या काळजाचा ठोका चुकावा अशी ती आहेच. परंतु चक्क अक्षय खन्नासारखा अभिनेताही तिच्या सौंदर्याचा शिकार व्हावा, हे विशेष आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा आता अनेक दिवसांपासून एकही सिनेमा आलेला नाहीये. दुसरीकडे मध्यंतरी काही काळ सिनेमांपासून दूर राहिलेल्या अक्षय खन्नाने काही दर्जेदार भुमिकांमधून सिनेमांमधे पदार्पण केल्याच पहायला मिळालं आहे. आणि असाच एक जमाना होता, ज्यावेळी ऐश्वर्या आणि अक्षय खन्ना या दोघांनी एकत्रीत सिनेमेदेखील केले होते. आणि दोन्ही सिनेमांना रसिकप्रेक्षकांच्या मनाची चांगलीच पसंती लाभलेली पहायला मिळाली होती. चला तर मग आपण जाणून घेऊयात की, अक्षय खन्नाने ऐश्वर्या राय हिच्याबद्दल नेमकं काय म्हटलं आहे?

२०१७ सालात झालेल्या एका टॉल्क शो या कार्यक्रमात जेव्हा अभिनेता अक्षय खन्ना याने हजेरी लावली होती. इत्तेफाक या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षय खन्ना या कार्यक्रमात आला होता. त्यावेळी प्रश्नोत्तरांच्या दरम्यान त्याने सांगितले की, ऐश्वर्या खुपच सुंदर आहे. तिच सौंदर्य सदाबहार आहे. ती जगातील सर्वाधिक सुंदर स्त्री आहे असं मला वाटतं. मी तिला जेव्हा जेव्हा भेटलो आहे मी तिच्याकडे फक्त पाहतच राहतो. मी हरवून जातो आणि हे ऐश्वर्यालाही माहित आहे. कारण ऐश्वर्या सोबत दोन सिनेमे केलेले आहेत. तिला या गोष्टींची माहिती आहे. मी तिचा चाहता आहे. बऱ्याचदा माझं असं तिच्याकडे एकटक पाहत राहणं वेगळ वाटू शकतं परंतु हे सत्य आहे. अक्षय खन्नाने दिलेल्या उत्तराने कार्यक्रमात आलेली सोनाक्षी सिन्हादेखील आधी चकीत झाली होती. परंतु तीदेखील पुढे म्हटली की, ऐश्वर्या राय म्हणजे अगदी सौंदर्याची अंतीम परिभाषाच आहे. अक्षय खन्नांच्या या प्रामाणिक खुलाशाने अनेकांना चकीत करून सोडलं होतं. ऐश्वर्या राय आणि अक्षय खन्ना यांनी एकत्र दोनच सिनेमे केले आहेत. दोघांची ऑनस्क्रीन जोडी रसिकप्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

असं म्हटलं जातं की, “ताल” आणि नंतर झालेल्या “आ अब लौट चले”, या दोन्ही सिनेमांच्या शुटिंगदरम्यान दोघांची चांगली मैत्री होऊन दोघे प्रेमातही पडले होते. परंतु पुढे काही दिवसांनंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात सलमान खान याची एन्ट्री झाली. आणि बाकी सलमान ऐश्वर्या या गोष्टी तर आज तमाम रसिकप्रेक्षकांना ठाऊक आहेतच. बॉलिवूडमधे स्वत:चा ग्लॅमरस अंदाज टिकवून सौंदर्याच्या जोरावर लाखोंच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ऐश्वर्या रायच्या प्रेमात एक ना अनेक अभिनेते पडले असतील परंतु स्पष्टपणे कबुली कोणी देऊ शकतं नाही. पण अक्षय खन्नाने मात्र फार काही विचार न करता बिनधास्तपणे ही गोष्ट बोलून दाखवली. अक्षय खन्ना हा अभिनेता एक हरहुन्नरी कलाकार तर आहेच, त्याशिवाय त्याच्या स्वभावानेही तो अगदी दिलखुलास असल्याचा पहायला मिळतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!