मित्रांनो!, असं म्हणतात की, बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीच्या चंदेरी दुनियेमध्ये प्रवेश केल्यानंतर फिल्मस्टार्स एकतर यशोशिखरावर असतो.. किंवा मग थेट जमिनीवर आपटलेला. ज्याला बॉलीवूडच्या भाषेत फ्लॉप स्टार म्हणतात. परंतु नवलाईची गोष्ट अशी की, काही नशीबवान स्टार्स विशेषतः अभिनेत्री तरीसुद्धा लोकांच्या स्मरणात मात्र तो कलाकार कायम राहत असतो. आपले नशीब पालटवे या आशेने कित्येक कलाकार आपल्या नवीन चित्रपटाबद्दल खूपच उत्सुक असतात पण प्रत्येकाचं नशिब पालटतेच असे नाही. काहींच्या पदरात निराशा देखील पडते.

आज अशाच काही अभिनेत्र्यांबद्दल या लेखात आपण जाणून घेणार आहोत, ज्यांच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात खूप चांगली झाली, परंतु काही कालावधीनंतर त्या आपली लोकप्रियता टिकवू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांना बॉलीवूड इंडस्ट्री तर सोडावी लागली. असे असले तरी त्यातील काही सुपर फ्लॉप अभिनेत्रींनी मात्र आपल्या स्टारडम चा सुयोग्य फायदा उठवत समाजातील प्रतिष्ठित, अब्जाधीशांना गटवून त्यांच्यासोबत सोबत लग्न केलं. आणि आता त्या आलिशान राजेशाही जीवन एन्जॉय करत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात अशाच काही डोकेबाज अभिनेत्रींनबद्दल.

टीना मुनीम– अंबानी: बॉलिवूडची एकेकाळची टॉपची अभिनेत्री असलेल्या ‘टीना मुनीम’ला सगळेच ओळखतात. कर्ज, रॉकी सारख्या अनेक चित्रपटांतुन टीना झळकली आणि तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली. सुरुवातीच्या काही चित्रपटात तुफान गाजलेली टीना नंतर मात्र काही खास कामगिरी करू शकली नाही. हळूहळू तिची लोकप्रियता कमी होऊ लागली. अशातच तिची मैत्री रिलायन्स ग्रुपचे मालक अनिल अंबानी यांच्यासोबत झाली.

 

नंतर मग दोघे विवाहबंधनात अडकले. टीना आता रिलायन्स समूहाच्या सामाजिक कार्याला चालना देण्यासाठी कार्य करते आहे. टीनाच्या नेतृत्वात कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आणि सिल्वर फाऊंडेशन चालवले जात आहेत. टीना लग्नापूर्वी बॉलिवूडची एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम केला..

शिल्पा शेट्टी-कुंद्रा: बॉलिवूडचे परफेक्ट पॅकेज म्हटल्या जाणाऱ्या सुंदर शिल्पा शेट्टीने लंडनमधील उद्योगपती राज कुंद्राशी 22 नोव्हेंबर 2009 रोजी लग्न केले. शिल्पा ही राजची दुसरी पत्नी आहे. शिल्पाने बॉलिवूडमध्ये बरेच नाव कमावले आहे. शिल्पा नेहमीच तिच्या परफेक्ट फिगरबद्दल चर्चेत असते. राजने शिल्पाला आयपीएल टीम राजस्थान रॉयल्स भेट म्हणून दिली. नुकतेच राज कुंद्राला पॉर्न फिल्म संबंधित प्रकरणात अटक झालीय.

अमृता अरोरा: अमृता अरोराची चित्रपट कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच संपली होती. अमृताने बरेच चित्रपट केले पण तिचे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले आणि ते बॉलीवूडच्या फ्लॉप अभिनेत्रींपैकी एक बनली. चित्रपटांमध्ये यश न मिळाल्यानंतर तिने बॉलिवूडचा निरोप घेऊन प्रसिद्ध व्यावसायिक शकील लडाक यांच्या बरोबर केले. शकील हे आंतरराष्ट्रीय ब्रँड असलेल्या अनेक कन्स्ट्रक्शन कंपनीजचे मालक असून, त्यांचे जगभर प्रोजेक्ट्स बिल्डिंग प्रोजेक्ट्स चालतात.

असिन: आमिर खान सोबत ‘गजनी’ या चित्रपटात असिन पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये झळकली. गजनी मधील असिनच्या कामाची फार प्रशंसा झाली. पण त्यांनतर मात्र असिन ला फारशी संधी मिळाली नाही. नंतर एक दोन चित्रपट आले परंतु त्यातही असिन काही फारशी उल्लेखनीय कामगिरी करू शकली नाही. नंतर मग असिनने मायक्रोमॅक्स कंपनीचे संस्थापक राहुल शर्माशी लग्न केले. असिनने राहुल शर्माशी लग्न केले तेव्हा त्यांची संपत्ती जवळपास 5000 कोटी रुपयांच्या जवळपास होती.

आयेशा टाकीया: बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकियाने 2004 मध्ये आलेल्या ‘टार्जन द वंडर कार’ या चित्रपटात पदार्पण केले. सलमान खान, आयशा टाकिया यांच्या फिल्मी करिअरबरोबर वाँटेड हा चित्रपट केल्यावर सलमान खान पुन्हा चर्चेत आला. आयशाला मात्र तितकी प्रसिद्धी मिळाली नव्हती. तरीही एक काळ असा होता की आयेशाचे खूप चाहते होते. 2009 मध्ये तिने सुप्रसिद्ध राजकीय नेते अबू आझमी यांचे चिरंजीव फरहान आझमी सोबत लग्न केले. त्याच्या कुटुंबाचे फक्त एका उत्पन्न सुमारे 75 कोटींवर जाते.

सेलिना जेटली: बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सेलिना जेटलीने 2003 मध्ये ‘जानशीन’ या चित्रपटाद्वारे चित्रपटापासून पदार्पण केले होते. एवढेच नाही सेलिनाने मिस युनिव्हर्सचा मुकूटही जिंकला आहे. सेलिनाने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले. पण तिला फारसे यश मिळू शकले नाही.

नंतर मग तिने ऑस्ट्रियन व्यावसायिक पीटर हग सोबत लग्न केले. सेलिनाचा नवरा दुबई आणि सिंगापूरमधील सुप्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल्सचा मालक आहे.
असो… शेवटी ज्याचे त्याचे नशीब.