मित्रांनो! मुंबईला मायानगरी असे देखील म्हणतात. आणि ते का?… हेच समजून घेण्यासाठी आज आपण अशा एका अभिनेत्रबद्दल जाणून घेणार आहोत जी केवळ ५०० रुपये घेऊन मुंबईमध्ये आली होती. यासाठी तिने आपले शिक्षण सुद्धा अर्धवट सोडले पण आज ती नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहे. एका नव्या शहरात वास्तव्यास येणे हे एका तरुण मुलींसाठी खूपच अवघड आणि आवहनात्मक असते.

पण तिने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आणि आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी खुपच धडपड केली. एका मुलाखतीत तिने सांगितले की, “अगदी माझ्याकडे एक रुपया सुद्धा खिशात नसताना मी दररोज ३० किलोमीटर ऑडिशनला जात होते. परंतु ही ऑडिशन बहुधा टीव्ही जाहिरातींसाठी असायची आणि प्रत्येकवेळी तिच्यावर खूप दबाव सुद्धा असायचा की जर काम मिळाले नाही तर घरभाडे, घरखर्च करायचा कसा? कोण देणार?”

पण या जिद्दी मुलीने हार मानली नाही व तिला तिच्या आयुष्यातील पहिली टीव्ही जहिरात मिळाली जी डेरी मिल्क कॅडबरीची होती. तर आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती इतर कोणी नसून बॉलिवूडची नामांकित अभिनेत्री दिशा पाटनी आहे. दिशा पाटनी तिच्या शाळेच्या दिवसातही खूप सुंदर दिसायची आणि ती आजही तशीच आहे.

दिशा पाटनी शाळेत असताना तिचा क्रश रणबीर कपूर होता. ती इतकी रणबीरची फॅन होती की ती रणबीरचा फोटो अगदी उशीखाली घेऊन झोपत होती इतकेच नव्हे तर तिने तिचे संपूर्ण घर रणबीरच्या फोटोनी अगदी भरून टाकले होते. दिशाला लहानपणापासूनच अभिनयाची खूपच आवड होती.

तिने शाळेत असताना अनेक नाटकांमध्ये काम केले होते आणि तिला या नाटकांसाठी अनेक पारितोषिके मिळाली होती. तेव्हा पासून तिचे बॉलीवूडमध्ये येण्याचे स्वप्न होते. दिशा लहानपणापासूनच खूप हुशार व चलाख होती आणि आज ती एक इलेक्ट्रिक इंजिनियर आहे, आणि अशीच एकदा दिशा आपल्या स्वप्नांच्या मागे फक्त ५०० रुपये घेऊन मुंबईत आली. ज्यासाठी तिच्या घरच्यांचा खूपच विरोध होता पण तरीही ती कोणाचे सुद्धा ऐकणारी नव्हती.

एका कार्यक्रमात बोलताना ती म्हणाली की मीं कोणालाही न सांगता फक्त 500 रुपये घेऊन मुंबईत आले होते आणि त्यावेळी आपण आपल्या कुटुंबाची देखील मदत मागितली नाही. थोडे दिवस मूंबईत राहून मग मीं येथे मॉडेलिंग सुरू केले आणि मॉडेलिंगमध्ये आपला हात बसल्यानंतर हळूहळू अभिनयाच्या दुनियेत तिने पाऊल टाकले. आणि तिने आपल्या फिल्मी करियरची सुरवात एका तेलगू चित्रपटांतून केली.

आज ती बॉलिवूडची एक मोठी स्टार बनली आहे. दिशा पाटनी आता वांद्रे, मुंबई येथील एका आलिशान घरामध्ये राहते. तिच्या घराची किंमत सुमारे ५० कोटी रुपये इतकी आहे. ती आज एक बॉलिवूडमधील सर्वांत सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत ज्यामध्ये बागी,एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी, मलंग या चित्रपटाचा समावेश आहे.

तिचा एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट खूपच गाजला होता आणि तेव्हापासूनच ती प्रकाशझोतात आली. तेव्हा पासून तिची यशाची एक्सप्रेस कोठेही थांबली नाही. त्या नंतर तिला अनेक चित्रपट मिळत गेले. नुकतीच ती सलमान खानसोबत ”राधे” या चित्रपटात झळकली होती.