मित्रांनो!, मराठी रसिक प्रेक्षकांना सदैव उत्तमोत्तम आणि दर्जेदार मालिकांची मेजवानी देणाऱ्या झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवरील तीन मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. त्यातील एक म्हणजे देवमाणूस ही मालिका या मालिकेच्या जागी आता लवकरच “ती परत आलीये” ही मालिका १६ ऑगस्ट पासून प्रसारित होत आहे. तर लवकरच झी मराठी वाहिनीवर “माझी तुझी रेशीमगाठ” ही नवी मालिका दाखल होत आहे.

नुकताच या मालिकेचा प्रोमो पाहण्यात आला असून त्या प्रोमोमध्ये एक चिमुरडी श्रेयस तळपदेला लग्नाची बोलणी करताना दिसत आहे. त्यामुळे सध्या या मालिकेबाबत खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेतून श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे हे दोन कलाकार छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. या मालिकेतल्या चिमुरडीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

प्रोमोमध्ये दिसणारी ही चिमुरडी आहे “मायरा वायकुळ”. मायरा वायकुळने टिक टॉक सारख्या व्हिडिओजच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. टिक टॉक स्टार म्हणूनही तिची ओळख आहे. इन्स्टाग्रामवरही तिचे खूप फॉलोअर्स आहेत. युट्युबवर Myra’s corner नावाने मायराचे चॅनल आहे. त्यावर तिचे आतापर्यंत ८६ हजार फॉलोअर्स झाले आहेत. तिच्या या चॅनलवर तिचे अनेक व्हिडीओज तुम्हाला पाहायला मिळतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

अगदी हळदी कुंकू समारंभ ते तिने बनवलेला केक तुम्हाला या व्हिडिओतून पाहायला मिळेल. मायरा सध्या आपल्या कुटुंबासोबत मुंबईत वास्तव्यास आहे. मायराचे वडील गौरव वायकुळ आणि आई श्वेता थोरात वायकुळ हे दोघेही मायराला सतत प्रोत्साहन देत असतात. आपली लाडकी लेक काहीतरी खास आहे या उद्देशाने त्यांनी सुरुवातीला तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले.

या व्हिडिओजना प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. मायरा सगळीकडे हिट झाली त्यामुळे त्यांनी तिच्या नावाने युट्युबही सुरू केले. तिच्या या चॅनलवर अनेक चाहत्यांच्या सुंदर सुंदर प्रतिक्रिया देखील मिळाल्या आहेत. आता लवकरच मायराला आणखी प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे.

हा प्लॅटफॉर्म आहे झी मराठी वाहिनीचा. “माझी तुझी रेशिमगाठ” या मालिकेतून मायरा श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांच्यासोबत झळकणार आहे. आपल्या या भूमिकेसाठी मायरा आणि तिचे कुटुंब देखील खूपच उत्सुक असलेले पाहायला मिळत आहे. प्रोमोतच तिने आपल्या बोलण्याने प्रेक्षकांची मने तर जिंकली आहेतच पुढे जाऊन या कलाकारांमुळे ही मालिका हिट ठरणार हे वेगळे सांगायला नकोच.