मित्रांनो!, आत्ताच्या घडीला झी मराठी वाहिनीवर सुरू असलेली अत्यंत लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ एका अकल्पित वळणावर येऊन पोहोचली आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी मालिकेतील नायक नायिका अर्थात ओम आणि स्वीटूच्या लग्नाची अगदी धुमधडाक्यात तय्यारी सुरु होती आणि अचानक….. अचानक एक वेगळाच ट्विस्ट आला आणि रसिक प्रेक्षकही अवाक झाले.

या ट्विस्ट मध्ये ओम आणि स्वीटूच्या लग्नाचा ट्रॅक भलत्याच वळणावर जाऊन थेट मोहित आणि स्वीटूचंच लग्न झालं. हा ट्विस्ट मालिकेला चांगलाच महागात पडतोय कारण, सोशल मीडियावर याचे चांगलेच पडसाद उमटत आहेत. प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेली ही मालिका आता तेच प्रेक्षक चक्क बंद करायची मागणी करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

मालिकेतील मालविकाने तिची कटकारस्थान सुरू ठेवत स्वीटू आणि ओमचा चांगलाच खेळ मांडला आहे. आधी साखरपुडा मग संगीत नंतर हळद असे सगळे कार्यक्रम पार पडल्यानंतर अचानक ओम लग्नातून गायब होतो आणि नेमकी मुहूर्ताची वेळ टळत असते. मग काय मालविका आपला डाव टाकते आणि स्वीटूसोबत मोहितला लग्नासाठी उभा करते. अहो इतकचं नाही तर हा ट्विस्ट इथपर्यंत येऊन थांबला नाही. इथे थेट स्वीटू आणि मोहितच लग्न देखील होतं.

मोहित स्वीटूला कुंकू लावतो आणि इतक्यात ओम तिथे पोहोचतो. मग काय बिचारी स्वीटू या सगळ्या प्रकारामुळे कोलमडून जाते आणि एक वेगळाच भावनिक आक्रोश इथे निर्माण होतो. मालिकेतील ट्विस्ट भले पात्रांसाठी भावनिक असेल पण यामुळे प्रेक्षक मात्र मालिकेवर फारच संतापले आहेत. परिणामी अनेकांनी मालिका बंद करण्याचीही मागणी केली आहे.

रसिक प्रेक्षकांनी हा काय फालतूपणा आहे असे प्रश्न सुद्धा विचारले आहेत. तर आता कोणी सीरियल पाहणार नाही असे देखील अनेकांनी म्हटलं. याशिवाय अनेक प्रेक्षकांनी तर लेखकावरच संताप व्यक्त केला. यात कहर म्हणजे ही मालिका त्वरित बंद करा, अशी मागणी अनेकांनी सोशल मीडियावर केली आहे. त्यामुळे प्रेक्षक मालिकेवर किती संतापले आहेत हे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान गेले अनेक दिवस प्रेक्षक आपल्या लाडक्या स्वीटू आणि ओमच्या लग्नाची वाट पाहत होते. पण या एपिसोड नंतर प्रेक्षकांचा चांगलाच अपेक्षाभंग झालाय.

ओम आणि स्वीटूच लग्नं होतंय हे पाहून अनेकांची उत्सुत्कता इतकी वाढली होती की आता काय बोलावे… पण आता या ट्विस्टने प्रेक्षकांची हृदये तटातट तोडली गेली आहेत. पण विशेष म्हणजे स्वीटू तर खानविलकरांच्याच घरात नांदायला आली. कारण मोहितच्या आईने त्यांना हाकलून दिल असं दाखविण्यात आलं आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे नक्की काय घडणार आहे हे पाहणं जरा .. जरा कसलं? भलतंच औत्सुक्याचं ठरेल. बघू आता पुढे काय घडतंय ते… नाहीतरी आपल्या हातात काय आहे म्हणा..? (तसं पाहायला गेलं तर “रिमोट” आपल्याच हातात आहे की!) काय?… असो…