प्रत्येक नात्यामध्ये विश्वास खूप महत्वाचा असतो… असे म्हणतात नात्यामध्ये विश्वास आणि प्रेम असेल तर कुठल्याही संकटाला सामोरी जाण्याचे बळ येते. पण लग्ना आधीपासुनच शिवा आणि सिध्दीचे एकमेकांशी कधीच पटले नाही. मग त्यामागे शिवाची वागणूक असो, त्याचे विचार असो वा त्याचा आत्याबाईंना असलेला पाठिंबा असो… तर शिवाला देखील सिध्दी एक क्षण देखील समोर सहन होत नाही… पण हळूहळू मात्र या दोघांचे नाते बदलू लागले. शिवाचे कधी सिध्दीला कधी तिच्या घरच्यांना मदत करणे, तिची काळजी घेणे, सिध्दीसाठी शिवाचे आईच्या विरोधात जाणे या सगळ्या गोष्टींमुळे सिध्दीला कुठेतरी आता शिवाबद्दल आपुलकी, प्रेम वाटु लागले आहे… पण शिवाच्या मनामध्ये नक्की काय आहे ? त्यालासुध्दा सिध्दीबद्दल आपुलकी वाटते आहे का ? हे लवकरच प्रेक्षकांना कळेल…

शिवा सिध्दीमागे नेहेमीच खंबीरपणे उभा राहिला आहे, वारंवार आलेल्या अडचणीमधून त्याने सिध्दीला बाहेर काढले आहे, तर सिध्दीने देखील शिवाच्या कुटुंबाची अगदी स्वत:च्या घरातील माणसांप्रमाणे काळजी घेतली आहे, त्यांना प्रेम दिले आहे… पण शिवाचे चांगले वागणे हे फक्त पक्षकार्य आहे का ? हा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही. कारण, जलवासोबत बोलत असताना शिवाने तशी कबुली दिली की, जे काही तो सिध्दीसोबत चांगले वागत आहे ते निव्वळ आत्याबाईंना दिलेल्या शब्दाखातर बाकी त्याच्या मनामध्ये सिध्दीबद्दल असे काही नाही… पुढे मालिकेमध्ये काय होणार ? ही खरच शिवा आणि सिध्दीच्या नात्याची गोड सुरुवात असेल ? हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा जीव झाला येडापिसा सोम ते शनि रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर