”सिनेमा हा समाज मनाचा आरसा असतो” या उक्तीप्रमाणे आजवर अनेक सिनेमे समाजातील काही घटनांवर आधारित आहेत तर काही घटनांच्या पार्श्वभूमीवर तयार झाले. सध्या दिल्लीत सुरु असलेला ज्वलंत आणि संवेदनशील विषय शेतकऱ्याचे आंदोलन आणि त्यांचे प्रश्न अनामिक योगायोगाने मोठ्या पडद्यावर अवतरले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेमका दृष्टिक्षेप टाकणारा हा सिनेमा मार्च २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता मात्र लॉकडाऊन परिणामी सिनेमा प्रेक्षकांपर्यत पोहोचू शकला नाही. मात्र २०२१ या नवीन वर्षात लवकरच येण्याची शक्यता आहे. सिनेमाची कथा एका व्यवसायाभिमुख तरुणाच्या म्हणजेच अजिंक्य (भूषण प्रधान) च्या भोवती फिरणारी आहे.

व्यवसायीकरणाच्या हट्टापायी पायमल्ली होत असलेल्या अनेक गोष्टीवर या सिनेमाच्या माध्यमातून प्रकाश  टाकण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्याच्या समस्या आणि त्या ओघाने आलेले अतिशय महत्वाचे विषय सिनेमात मांडले आहेत.

सध्या सोशल मीडियाववर ट्रेंड होणारा #AjinkyaTheMovie हा ट्विटर हॅण्डल मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांकडून पहिला जात आहे.भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयावर तयार करण्यात आलेला व्हिडीओला सर्वच स्तरावर पसंती मिळत आहे. शेतकरी जगवण्यासाठी आणि त्याच्या प्रगतीसाठी मोठ्याप्रमाणावर खुल्या केलेल्या  दालनांबद्दल दिलेली माहिती  या व्हिडीओत प्रामुख्याने पाहायला मिळतात.

अजिंक्य हा सिनेमा सिनेमागृहात आल्यावर प्रेक्षक नक्की पाहतील मात्र सध्या अजिंक्यची नेमकी भूमिका पंतप्रधान मोदीजींच्या निर्णयातून संपूर्ण भारताला पाहायला मिळत असल्याचे मत सिनेमाचे निर्माता नीरज आनंद यांनी मांडले आहे.

अजिंक्य ही  निव्वळ व्यक्ती किंवा भूमिका नसून ते क्रांतिकारी विचारांचे बीज आहे पाहून आपल्यातील प्रत्येकाच्या मनात आणि विचारत रुजेल. ज्याचा परिणाम अन्नदाता वाचवायला आणि टिकवायला मदत होईल