बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुपरस्टार शहिंशा अभिनेते अमिताभ बच्चनजी यांच्या कुटुंबाचे आणि गांधी- नेहरू परिवाराच्या मैत्रीची सुरुवात ही इलाहाबाद येथील “आनंद भवन” पासून सुरू झाली होती. तेव्हा सरोजिनी नायडू यांनी पहिल्यांदाच हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांची इंदिरा गांधी सोबत भेट घालून दिली होती.

दोन्ही कुटुंबातील मैत्री ही दिल्ली पर्यंत उत्कृष्ट टिकली. त्यानंतर पुढच्या पिढीने त्यांच्यातील मैत्री आणखी मजबूत केली आणि हे दोन्ही परिवार एकमेकांच्या सुख- दुःखात सदैव उभे राहू लागले.

“कुली” या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जेव्हा अमिताभ बच्चन हे जखमी झाले होते, तेव्हा त्यांना सर्वांत आधी राजीव गांधी यांनीच हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तसेच अमिताभ बच्चन यांच्या उत्तम आरोग्यासाठी देवराहा या बाबांकडून ताईत आणण्यापासून ते आपल्या ओळखीतील ब्राह्मणांकङून पूजाविधी करून घेण्याचे सर्व काम देखील त्यांनी केले होते.

अशाप्रकारे अमिताभ बच्चनजी यांच्या प्रत्येक मदतीला राजीव गांधी नेहमीच उभे राहायचे. त्यानंतर सोनिया गांधी जेव्हा जानेवारी 1968 मध्ये पहिल्यांदा भारतात आल्या. तेव्हा पालम एअरपोर्टवर अमिताभ बच्चनजी त्यांना आणायला गेले होते. सोनिया गांधी ह्या दिङ महिन्यांपर्यंत बच्चन परिवाराच्या घरी पाहुण्या म्हणून राहिल्या होत्या. पुढे बच्चन परिवाराने सोनिया व राजीव गांधी यांच्या विवाहात सुद्धा अतिशय महत्त्वाची भूमिका निभावली.

तेजी बच्चन यांना आपली तिसरी आई म्हणायच्या सोनिया गांधी : काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, लग्नाच्या आधी आईंनी म्हणजेच इंदिरा गांधी यांनी त्यांना बच्चन कुटुंबाच्या घरी राहायला सांगितले होते. तेथे तिला भारतीय संस्कृती, आपले रीती- रिवाज शिकायला सांगितले. तर सोनिया खूप काही शिकल्या सुद्धा होत्या. मीडियाला दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी ह्या इंदिरा गांधी व्यतिरिक्त तेजी बच्चन यांना आपली तिसरी आई मानायच्या.

तुम्हांला माहित आहे का, राजकीय वातावरणात अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी यांचे बिनसले. तेव्हापासूनच अभिनेते अमिताभ बच्चनजी यांनी राजकारणाला कोसो दूर ठेवले. त्यानंतर राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर तर बच्चन परिवार त्यांच्यापासून आणखी दूर झाला.

अभिषेकच्या प्रिमियरला न येता बहाणा मा’रला सोनिया गांधीनी : मीडिया रिपोर्टस् नुसार अभिषेकच्या पहिल्या ङेब्यू फिल्मच्या प्रिमियरसाठी सोनिया गांधी यांना सुद्धा आमंत्रित केले होते. मात्र त्यांनी साफ नकार दिला होता.

याचे कारण त्यांनी सांगितले होते की, काँग्रेसच्या कायद्यांनुसार पार्टीचे अध्यक्ष कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये असलेल्या अशा कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित होत नाही. कारण पार्टी साधारण आयुष्य, उच्च विचार या सिद्धांतांचे पालन करते. तसे म्हटले तर सोनिया गांधी त्या काळात देखील काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.