Tujhyat Jeev Rangala Serial Closed

एकच गोष्ट रोज रोज म्हणलं की कंटाळा येतो तसं झी मराठी वाहिनीवर चाललेल्या एका मालिकेबाबत रसिक प्रेक्षकांचं झालेलं आहे. त्या मालिकेचं नाव आहे, तुझ्यात जीव रंगला.

होय, राणा दा आणि अंजली यांच्या घराघरात पोहचलेल्या जोडीची मालिका. पण प्रेक्षकांना आता त्या मालिकेच्या जागेवर नवीन मालिका पाहण्याची इच्छा झाली आहे. आणि ती इच्छा लवकरचं पूर्ण होणार आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका खूप प्रसिद्ध झाली आहे. पण कोरोना महामारीमुळे बऱ्याच मालिकांच्या किंवा चित्रपटांच्या शूटिंगला अडथळे येत आहेत. काही शूटिंग बंद झाल्या आहेत तर काही शूटिंगची ठिकाणे बदलली आहेत.

कारण संसर्ग न वाढावा यासाठी. तरी सरकारने दिलेल्या नियमावली नुसार अनेकांचे शूटिंग चालू आहे. काही शूटिंगमध्ये कलाकारही बदलले आहेत ज्यांना या कोरोना मध्ये शूटिंग करायची नाही. यामुळेच आता काही जुन्या मालिका बंद होऊन नवीन मालिका येत आहेत. ज्यात नव्याने कलाकार ही नियमावली मधील वयोमानानुसार असणार आहेत.

राणा आणि अंजली यांच्या जोडीची ” तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आता चालू होऊन चार वर्षे झाली आहेत. या एवढ्या मोठ्या कालावधीत या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

राणादा आणि अंजली आता घराघरांत अगदी रुळले आहेत असं म्हणलं तर वावग नाही. पण आता कोरोना काळानंतर प्रेक्षकांची ही आवड जरा बदलली असच म्हणावं लागेल. सगळं जग बदललं तर ती का नाही बदलणार. साहजिकच. तर त्या जागी नवीन मालिका येत आहे. कारभारी लयभारी ही मालिका 2 नोव्हेंबर पासून संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. प्रेक्षकांना लवकरचं नव्या मालिकेच्या नव्या कथेची अनुभूती घेता येणार आहे. तया मालिकेचे दोन्ही प्रोमो खूप व्हायरल झाले आहेत. मालिका राजकारण आणि प्रेम याभोवती आहे असं चित्र प्रोमो पाहून स्पष्ट होत आहे.