टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा बर्‍याच अभिनेत्री आल्या आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेच तसेच छोट्या पडद्यावरही राज्य केले. पण काही काळानंतर त्यांनी स्वत: ला अभिनयापासून दूर केले आणि टेलीव्हिजन इंडस्ट्री सोडली. काहींनी कायमचा अभिनयच सोडून दिला. तर चला जाणून घेऊया कोण आहेत त्या अभिनेत्री…

null

राजश्री ठाकुर: तुम्हाला राजश्री ठाकूर आठवते का? ‘साथ फेरे: सलोनी का सवार’ सारख्या शोमधून घराघरात हिट झालेल्या राजश्री ठाकूर यांनी ‘भारत का वीर पुत्र- महाराणा प्रताप’ या मालिकेतही काम केले होते. पहिल्याच शोसाठी तिला बेस्ट फ्रेश फेस ऑफ द इयर किताबही मिळाला होता. पण 2015 मध्ये राजश्री ठाकूरने स्वतःला अभिनयापासून दूर केले. आणि 2017 मध्ये ती एक सुंदर मुलीची आई बनली.

null

मोहिना कुमारी: को’रो’ना संक्रमणाशी झुंज देणारी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, फेम अभिनेत्री मोहिना कुमारी सिंगनेही अभिनयाला निरोप दिला आहे. एका मुलाखतीत तिने म्हटले आहे की लग्नानंतर अभिनय न करण्याचे तिने ठरविले आहे. 2018 मध्ये उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांच्या मुलाशी तिने लग्न केले आणि अभिनयाला कायमचा रामराम केला आणि मुंबईहून देहरादूनला शिफ्ट झाली.

null

रुचा हसब्निस: ‘साथ निभाना साथिया’ मध्ये राशीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आठवते? ही भूमिका रुचा हसाबनिस यांनी साकारली होती. रुचाने 2009 मध्ये ‘चार चौगुणी’ या मराठी नाटकातून आपल्या करियरची सुरुवात केली होती आणि 2015 मध्ये लग्नानंतर तिने टीव्ही इंडस्ट्रीला निरोप दिला. रुचा आता पतीसमवेत परदेशात राहत आहे.

null

नेहा बग्गा: ‘बानी: इश्क दा कलमा’ आणि ‘पिया रंगरेज’ सारख्या टीव्ही शोमध्ये दिसणारी अभिनेत्री नेहा बग्गा टीव्हीची दुनिया सोडून आता टिकीटॉक स्टार बनली आहे.

null

मिहिका वर्मा: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये मिहिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिहिका वर्मा लग्नानंतर अभिनय सोडून अमेरिकेत स्थायिक झाली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.