मित्रांनो!, लोकप्रिय बॉलीवूड व टेलिव्हिजन अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे केवळ मुंबईतच नव्हे तर संगमनगरी प्रयागराजमध्ये सुद्धा खूपच शोककळा पसरली आहे. त्याच्या अकाली निधनाबद्दल रंगभूमी, टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीशी जोडलेल्या लोकांनी अतिशय दु:ख व्यक्त केले आहे.

कारण या शहराशी सिद्धार्थचे खूपच जवळचा संबंध होता. जरी सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला होता परंतु त्याचा सहवास, ओढा नेहमी प्रयागराजसोबतच होता. एक अभिनेता बनून प्रसिद्धी मिळवणाऱ्या सिद्धार्थचे वडील अशोक शुक्ला आरबीआयमध्ये सिव्हिल इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. ते अल्लापूर या परिसरात राहत होते.

बदलीनंतर अशोकजी यांनी १९७६-७७ मध्ये हे शहर सोडले. त्यानंतर ते मुंबई शहरात स्थायिक झाले होते. सिद्धार्थ शुक्लाचा जन्म हा मुळात मुंबईतच झाला होता. सिद्धार्थने मुंबईमधूनच आपली शाळा आणि महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण केले होते. सिद्धार्थ २००७ च्या अर्धकुंभ मध्ये सहभागी होण्यासाठी त्याच्या काही मित्रांसह प्रयागराजला आला होता. संगमस्नानासोबत त्याने मोठ्या हनुमानजींचेही दर्शन घेतले होते.

येथील साहित्यिक कार्यात सक्रिय असलेले बाबा अभय अवस्थी सांगतात की सिद्धार्थचे वडील काही वर्ष प्रयागराजमध्ये राहिले आहेत. प्रयागराज व्यतिरिक्त त्यांचे कुटुंबही कानपूरमध्ये राहिले आहे. ज्येष्ठ रंगकर्मी प्रवीण शेखर म्हणतात की, सिद्धार्थ यांचे अकाली निधन हे कलाविश्वाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे.

तसेच सिद्धार्थ हा तरुण रंगकर्मींसाठी एक आदर्श होता. असे म्हटले जाते की सिद्धार्थची प्रयागराजला खूप कमी भेट होत होती. पण जर कोणी येथून मुंबईला आले, तर तो त्या व्यक्तीला खूपच आदराने आणि आत्मीयतेने भेटायचा. दिग्दर्शक सुदिपा मित्रा सांगतात की बिग बॉस, बालिका वधू यांसह सर्व मालिकांमध्ये सिद्धार्थचे काम लोकांच्या हृदयाला स्पर्श करणारे होते.

प्रत्येक घरोघरी सिद्धार्थचे चाहते बघायला मिळायचे, पण त्याच्या अकाली जाण्यामुळे या सर्वाना खूप वे’द’ना होत आहे. अखिल भारतीय दांडी संन्यासी परिषदेचे संरक्षक जगद्गुरू स्वामी महेशश्रम यांनी सिद्धार्थ बद्दल माहिती देताना सांगतात की. काही वर्षांपूर्वी सिद्धार्थला हरियाणाच्या कुरुक्षेत्रातील एका कार्यक्रमात ते भेटले होते.

सिद्धार्थ हा खूपच धार्मिक स्वभावाचा होता. तसेच त्याला कुंभचे वैभव खूपच आवडायचे. तसेच त्याने मला असे सांगितले की ‘महाराज जी, देवाची कृपा असेल तर मी कुंभवर एक मोठा चित्रपट नक्कीच बनवेल. पण सिद्धार्थची हि इच्छा मात्र अपूर्णच राहिली. २०१९ च्या कुंभात तो प्रयागराजला येणार होता. पण त्याच्या एका सिनेमाच्या शूटिंगमुळे तो अतिशय व्यस्त होता. शेवटी त्याला यायला जमले नाही ते नाहीच…