होय मित्रांनो!, हा किस्साच तसा रंजक आहे. आज जरी शाहरुख बॉलीवूडचा बादशहा असला तरी ‘या’ अभिनेत्रीने मात्र खरोखर शाहरुख आणि गौरीची सुहागरात्रीची पुरती वाट लावून ती उध्वस्त केली होती. इतकी की, शाहरुख चक्क रडलाच होता.

बॉलिवूड किंग शाहरुख खान आज एक सुप्रसिद्ध व्यक्ती बनला आहे. या स्थानावर पोहचण्यासाठी त्याने शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक असा खूप संघर्ष केला आहे. कष्टाला पर्याय आणि शॉर्टकट नाही असे स्वतःला बजावत तो या स्थानावर पोहचला आहे. याच किंग खानसाठी अशी एक वेळ होती जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी त्याला अनेक बड्या लोकांचे अक्षरशः पाय धरावे लागत होते.

त्याकाळी रियल लाईफ आणि वर्क लाईफ अगदी दोन टोके म्हणता येतील, इतक्या वेगळ्या ठरत होत्या. त्या वेळेस शाहरुख गौरी एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. एकमेकांसाठी ते काय वाटेल ते करण्यास तयार होते, बॉलिवूड मधील त्यांची प्रेम कहाणी आज देखील तेवढीच प्रसिद्ध आहे. त्यांची लव्ह स्टोरी एखाद्या फिल्मपेक्षा काही कमी नव्हती.

शाहरुख आणि गौरी हे भिन्न जाती आणि धर्माचे असले तरी एकमेकांवरचे प्रेम, निष्ठा अन विश्वास मात्र अटळ होता. शाहरुख खान गौरीसाठी एवढे वेडा झाला होता की तिच्या प्रेमापुढे जाती धर्माच्या बंधनात अडकून राहिलाच नाही. त्यांचे सच्चे प्रेम आणि लग्नं शेवटी त्यांच्या कुटूंबीयांनापण मान्य करावंच लागलं.  त्यांचं लग्न धूमधडाक्यात झालं. पण लग्नानंतर लगेच शाहरुखला मुंबईला परत यावं लागलं, त्यामुळे तो गौरीलासुद्धा मुंबईस घेऊन आला. तेव्हा शाहरुख फिल्म ‘दिल आशना है’ मध्ये काम करत होता. फिल्मच्या प्रोड्युसर होत्या ड्रीमगर्ल हेमा मालिनी.

लग्नानंतर जेव्हा किंग खान गौरीसह मुंबईस आला, तेव्हा ते एका हॉटेलवर उतरले. त्यानंतर शाहरुखने हेमा मालिनी याना कॉल केला आणि तो मुंबईत आल्याची माहिती दिली आणि बायको गौरीबद्दल देखील सांगितलं. मात्र हेमा मालिनी शाहरुखला म्हणाल्या तुम्ही थोड्या वेळात शूटिंग साठी सेट वर पोहचा. धर्मेंद्रजी थोड्या वेळातच येतील, फोन झाल्यावर शाहरुख तडक नववधू गौरीला घेऊन सेटवर पोहचला.

Shahrukh Khan Gauri Khan

सेटवरील एका रूममध्ये थांबून ते फिल्मच्या शूटिंग साठी धर्मेंद्रची प्रतीक्षा करू लागले, ती रूम खूप घाण होती. तिथे डास देखील खूप होते त्यामुळे किंग खानला आणि गौरीला फारच त्रास झाला.धर्मेंद्रची वाट बघण्यात खूप वेळ गेला. मग कळलं की ते थोड्या वेळात पोहचलतील, म्हणून शाहरुख आवरून सेट वर शूटिंगसाठी साठी गेला. गौरी बिचारी त्याच रूम मध्ये रात्रभर बसून राहिली.

शेवटी पूर्ण रात्र संपल्या नंतर सकाळी 6 वाजता जेव्हा शाहरुख त्या रूममध्ये परत आला, तेव्हा गौरी बसल्या बसल्याच खुर्चीवरच झोपुन गेली होती. तिच्या अंगावर डास चावल्याच्या खुणा होत्या. त्यावरून शाहरुखला तिला रात्रभर झालेल्या त्रासाचा अंदाज आला. तो अस म्हणाला, की त्या रात्री माझ्या डोळ्यातुन अक्षरशः अश्रू वाहत होते. पण गौरीने मला समजावले की, काहीही झाले तरी करियर फर्स्ट!… आणि तेंव्हापासून मी ठाम निर्णय घेऊन करियर फर्स्ट! हेच ध्येय ठरविले.

मित्रांनो!, शाहरुखला या स्टेजपर्यन्त आणायला गौरीने खूप मदत केली आहे. आत्ता सुद्धा ती किंग खानला खूप मदत करते. शाहरुखचं करियर बनवता तिने आपला सुद्धा करियर बनवलं… आत्ता मात्र ते सुखाचं त्यांचं कौटुंबिक आयुष्य मुलांसह सुखासमाधानात जगत आहेत.