aishwarya ray shahrukh khan

बॉलिवूड मध्ये एक अशी अभिनेत्री होती, की जी सर्वांग परीण आहे. सौन्दर्य, अभिनय आणि नशैली डोळे. ती त्याकाळची राणी अभिनेत्री होती. आता मात्र ती उतार वयाला लागल्यापासून फार काही काम करताना दिसत नाही.

त्या अभिनेत्रीचं नाव आहे, ऐश्वर्या राय. जी आता बच्चन झाली आहे. कारण तिने अभिषेक बच्चन आहि लग्न केलेलं आहे.

ऐश्वर्या राय 1 नोव्हेंबर म्हणजे आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिचे चाहते सोशल मीडियावर अभिनंदन करत आहेत. तिच्या बॉलिवूड कारकिर्दीत ऐश्वर्याने ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ आणि ‘जोधा अकबर’ यासह अनेक हिट चित्रपट दिले.

याच दरम्यान, बर्‍याच वेळा असं घडलं की तिला काही न सांगता, विचारता अनेक चित्रपटांमधून बाहेरचा रस्ता दाखविला गेला. ऐश्वर्याने स्वतः एका मुलाखतीच्या वेळी हे उघड केलेलं आहे. तो का दाखवला गेला, हे आज अनेकांना माहीत नाही. म्हणून आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

तिला अनेक चित्रपटात काम भेटलं नाही याचं एकमेव कारण म्हणजेच शाहरुख खान. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात शाहरुखने तिला बऱ्याच चित्रपटांतून बाहेर काढलं. एका कार्यक्रमात शाहरुखनेही याची कबुली दिली होती.

जेव्हा ऐश्वर्या स्वत: ची ओळख निर्माण करण्यात गुंतलेली होती. तेव्हा कोणतेही कारण न सांगता बऱ्याच चित्रपटातून चित्रपटांतून कसं काढलं गेलं ? हे सांगितलं आहे.

ऐश्वर्याला ‘वीर झारा’ या सिनेमा मध्ये कास्ट केलं जाणार होतं; पण तिची जागा घेण्यात आली. ती भूमिका तिला मिळाली नाही. ऐश्वर्या म्हणाली ‘मी या प्रश्नाचे उत्तर कसं देऊ ? ती म्हणाली की त्यावेळी दोन चित्रपटांबद्दल चर्चा चालू होती.

आपण एकत्र काम करू. वगैरे वगैरे. आणि मग अचानक काहीचं स्पष्टीकरण न देता ते निघून गेले. हे का घडले याविषयी माझ्याकडे कधीच उत्तर नव्हते. ‘

ऐश्वर्या पुढे म्हणते की, ‘मी कोणत्याही चित्रपटासाठी कधीही नकार दिला नव्हता’. अनेक मोठ्या प्रकल्पांमधून बाहेर टाकल्यानंतर मी खूप दुःखी झाली होती.

ऐश्वर्या पुढे म्हणाली की, ‘बघा पाहा, जेव्हा तुम्हाला काही स्पष्टीकरण दिले जात नाही तेव्हा तुम्ही दु: खी आणि स्तब्ध आहात.’ ऐश्वर्या सांगते की, ‘मी शाहरुखला याबद्दल कधी विचारले नव्हते कारण ते माझ्या स्वभावात नाही.

एखाद्या व्यक्तीस हे समजावून सांगण्याची गरज वाटत असेल तर ते करतील. जर तो कधीच केला नसेल तर त्याने कधीही हेतू बाळगला नाही, मग काय आणि का असा प्रश्न उपस्थित करणे माझ्या स्वभावात नाही. मी कोणत्याही व्यक्तीकडे जाऊन असे का घडले हे विचारणार नाही. ‘