Salman Aishwarya

बाॅलिवूडचा दबंग अर्थात प्रेक्षकांचा अगदी चाहता अभिनेता म्हणजे सलमान खान. सलमान खानची ओळख इतरांना सांगावी तितकी कमीच आहे, मुद्याच म्हणजे सलमान अर्थात भाईजान ची जुनी प्रेमकथा पुन्हा एकदा चर्चेत रंग धरत असताना पहायला मिळाते आहे.

सलमान खानने आजवर अनेक हीट चित्रपट दिले आहेत, त्याच काम अजूनही सिनेसृष्टीत चालूच आहे. अनेक तरूण मंडळी जेव्हा बाॅलिवूड क्षेत्रात त्यांच्या कार्याने नावाजले जाऊ लागले अशांचं म्हणणं राहिलं आहे की, सलमान त्यांच्यासाठी एखाद्या गाॅडफादर प्रमाणे आहे.

सलमान सध्या बीग बाॅसचा पुढील सिजन होस्ट करताना पहायला मिळतो आहे. अनेकदा त्याच्या या कार्यक्रमातील त्याचे संवादही इतरांना खूप भावून जातात. सलमानचा शेवटचा चित्रपट “दबंग 3” थोडासा सरासरी हीट गेला होता परंतु मागची पर्वा न करता भाईजान आता “राधे” या बहुचर्चित सिनेमासाठी सज्ज झाला आहे.

आपण एक आशा करू शकतो की, लवकरात लवकर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येईल. आता नुकताच सोशल मीडियावर जोर धरला तो चक्क सलमान व ऐश्वर्या यांच्या प्रेमकथेतील त्या एका खास किस्याने. सलमानचं तिच्यावरील प्रेम जगजाहीर केव्हाच झालेलं आहे, परंतु काही कारणास्तव दोघांना एकत्र नाही पाहता आलं.

असं म्हटल्या जातं की, त्या काळी सलमानने लग्नासाठी ऐश्वर्याकडे तगादा लावला होता परंतु ऐश्वर्या इतक्यात करियर सोडून लग्न करू इच्छित नव्हती.

झालं असं की, या प्रेमाच्या कथेत दबंग म्हणवल्या जाणाऱ्या सलमानचा कधी एकदी व्हिलन झाला हेच कळलं नाही. ऐश्वर्या व सलमान दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत पण आज दोघेही एकमेकांच साध नाव घेणही टाळतात. आज दि. १ नोव्हेंबर रोजी ऐश्वर्या रायचा जन्मदिवस, आणि तिच्या नावाच्या निमित्ताने सलमान व ऐश्वर्याचा हा किस्सा मिडियावर प्रचंड उफाळून आला.

साल १९९९ साली एका रात्री हा किस्सा घडला, त्या काळी सलमान सोमी अलीच्या प्रेमात होता, पण ऐश्वर्या नवखी होती आणि तिला पाहून सलमान सोमीलाही विसरला होता. असं म्हटल्या जातं की, निम्म्या रात्री सलमान ऐश्वर्याच्या घरी पोहोचला होता आणि ऐश्वर्याला घराबाहेर बोलावण्यासाठी तिच्या घराचा दरवाजा ठोठावत राहिला, सलमान तिच्या ब्रेकअपच्या निर्णयाने चांगलाच रागात होता.

ऐश्वर्याने मात्र दार काही उघडलं नाही. जवळपास २-३ तास सलमान तिचे दार ठोठावत राहिला अगदी त्याच्या हातातून रक्त येईपर्यंतही. ठाम असलेल्या ऐश्वर्याने मात्र काही तासांनी दार उघडून सलमानला आत घेतले. सोमीशी प्रेमात असलेल्या सलमानने एकदा गरज पडल्यावर अमेरिकेत जाऊन तिची मदत केली होती; ही गोष्ट ऐश्वर्याला खटकली आणि तिने सलमानसोबत ब्रेकअप केलं.