Salman Khan Aishwarya

ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान यांच्याबद्दल आपण अनेक प्रकारच्या बातम्या ऐकल्या असतील. एकेकाळी त्यांच्या अफेअरच्या गोष्टी खूप सामान्य झाल्या होत्या.

कारण त्यांची जोडी इंडस्ट्रीत चर्चेत होती. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते.  पण मग असं काय घडलं ? कश्या मुळे दोघांचं नातं तुटलं ? चला तर मग जाणून घेऊ.

१९९९ मध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान एकत्र संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्यावेळी सेटवर या दोघांनी एकमेकांना मनापासून प्रेम केले आणि येथूनच त्यांच्या प्रेमाचे बीज रोवल्या गेलं.

सलमानसोबत अफेयर सुरू होताच ऐश्वर्या खान कुटुंबाच्या जवळची झाली. सलमानच्या कुटुंबात जेव्हा जेव्हा एखादा कार्यक्रम असायचा तेव्हा ऐश्वर्या तिथे नक्कीच जात असे. ऐश्वर्याने सलमानची बहीण अर्पिता आणि अल्विरासोबत चांगला वेळ घालवलेला आहे. पण ऐश्वर्याचं कुटुंब याविरोधात होतं.

असं म्हणतात की नोव्हेंबर २००१ मध्ये सलमान खान एके दिवशी ऐश्वर्याच्या अपार्टमेंटच्या बाहेर आला आणि दार वाजवलं. तो आत येण्याचा आग्रह करू लागला. एवढंच नाही तर सलमानने आत्महत्येची धमकीही दिली होती.

तसेच सकाळी तीन वाजेपर्यंत नाटक चालू राहिलं आणि त्यानंतर त्याला अपार्टमेंटमध्ये येण्याची परवानगी देण्यात आली. ऐश्वर्याने त्याच वेळी लग्नाचे आश्वासन द्यावे अशी सलमानची इच्छा होती. पण ऐश्वर्याला घाईघाईने हा निर्णय घ्यायचा नव्हता.

एका मुलाखतीत याबद्दल बोलताना सलमान म्हणाला, ‘तुम्ही जर कधीच प्रेमात भांडणं केले नाही तर याचा अर्थ असा होतो की तुमच्यात प्रेम नाही. मी कोणत्याही बाहेरील व्यक्तीशी विनाकारण भांडणार नाही. जेव्हा आपण भांडतो तेव्हा त्या भांडण्यात आपलं खूप प्रेम असतं. ती व्यक्ती खूप जवळची असते.

अपारमेंट मध्ये रातभर झालेल्या प्रकारामुळे ऐश्वर्या आणि सलमानचं नातं संपण्याच्या मार्गावर असताना, एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आला. सलमान ऐश्वर्याला न सांगता आपली एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीला मदत करण्यासाठी अमेरिकेत गेला.

हेच खूप मोठं कारण ठरलं. यानंतर दोघांत भिंत आणखी वाढली. २००२ मध्ये ऐश्वर्याने अधिकृतपणे ब्रेकअपची घोषणा केली.

हाच तोच काळ होता जेव्हा सलमान ऐश्वर्याच्या ब्रेकअप घोषणेने रागाच्या भरात चित्रपटाच्या सेटवर पोहोचला होता. जिथं शाहरुख आणि ऐश्वर्या एका सिनेमाचं शूटिंग करत होते. चित्रपटाच्या सेटवर सलमानने ऐश्वर्याच्या कानफाडीत मारण्याचा प्रयत्न केला.

शाहरुख खानबरोबर ही त्याचे भांडण झालं. सलमानने कसलाच विचार न करता शाहरुखची कॉलर पकडली असेही म्हंटलं जातं. सलमानच्या सेटवर वादग्रस्त वागण्यामुळे ऐश्वर्याला चित्रपटातून वगळण्यात आलं.

एका मुलाखतीत ऐश्वर्याने म्हटलं होतं की, सलमानसोबत तिच्या आयुष्यातील काळ सर्वात वाईट होता. ब्रेकअप झाल्यानंतरही तो मला कॉल करायचा आणि बडबड करायचा. त्याच्या सहकलाकारांशी माझा प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय यायचा. ज्यामुळे मला खूप त्रास व्हायचा..