सध्या कलाकार लोकं सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतात. तर काही फार काही लक्ष देत नाही. सध्या एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सोशल मीडियाला कायमचा रामराम ठोकलेला आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की तो अभिनेता कोण ? तर तेच आता आपण जाणून घेणार आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

मालिका विश्वापासून ते अगदी वेब सीरिज आणि चित्रपटांमध्येही झळकलेला एक मराठमोळा अभिनेता फार कमी कालावधीत प्रेक्षकांच्या ग’ळ्या’ती’ल ताईत झालाय. फक्त अभिनयामुळेच नव्हे, तर त्याच्यातील इतरही काही सुप्त गुणांमुळे तो अनेक कलाकारांच्या गर्दीतही त्याचं वेगळेपण सिद्ध करु पाहात होता. यात तो यशस्वीही झाला.

फोटोग्राफी म्हणू नका किंवा मग फिरस्तीची आवड, सोशल मीडियावर त्याची प्रत्येक पोस्ट ही तितकीच बोलकी. अगदी त्याच्या स्वयंपाक कौशल्याची ही. हा अभिनेता म्हणजे सुयश टिळक. तो नेहमी चांगला अभिनय आणि विचारांनी चर्चेत असतो. पण आता काय बिनसलं ते मात्र माहीत नाही. सुयश खूप उत्तम असा लोकप्रिय अभिनेता आहे.

लॉ’क’डा’ऊ’न काळातही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असणाऱ्या या अभिनेत्यानं आता मात्र या संपूर्ण वर्तुळापासून अर्थात सोशल मीडियापासून दुरावा पत्करला आहे. यामागचं कारण अद्यापही स्पष्ट झालेली नाही. पण, हो सुयशच्या मागच्या तीन इन्स्टाग्राम पोस्ट मात्र बरंच बोलून गेल्या आहेत.

“योग्य आणि अयोग्यतेच्या पलीकडेही एक मोकळं रान आहे. मी तुम्हाला तिथेच भेटेन”. रुमीची ही ओळ त्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. तर, दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यानं थेट शब्दांत काही गोष्टी स्पष्ट केल्याचं जाणवतं. ‘मला जे वाटतं ते मी करतो, जे वाटतं ते बोलतो. यादरम्यान काहीच नसतं. लोकं एकतर तुमच्यावर प्रेम करतील किंवा तुमचा राग करतील’, ही त्याची आणखी एक पोस्ट.

सोशल मीडियावर या पोस्टनंतर थेट त्यानं आणखी एका पोस्टच्या माध्यमातून या आगळ्यावेगळ्या सोशल जगतालाच अलविदा केल्याचं पाहायला मिळत आहे. खलील गिब्रान यांच्या ओळी पोस्ट करत त्यानं जणू त्याच्याही मनीचे भाव इथं मांडले आहेत. त्याच असं लिहिलंय, ‘प्रवास करा आणि कुणालाही सांगू नका. एख निखळ अशी प्रेमकहाणी जगा, कुणालाही सांगू नका, आनंदी आयुष्य जगा कुणालाही सांगू नका….. माणसं चांगल्या गोष्टींचा नाश करतात’.

सुयशनं सोशल मीडियावरुन काढता पाय का घेतला याचं कारण अद्यापही अस्पष्ट. पण, एखाद्या सेलिब्रिटीनं या वर्तुळापासून दुरावा पत्करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यामुळं सुयशच्या या निर्णयाचंही चाहत्यांनी स्वागतच केल्याचं पाहायला मिळालं.

हरकत नाही. त्याने खूप चांगला निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्याच्या या निर्णयामुळे आता सगळीकडे चर्चा चाललेली आहे. पण सुयश चा निर्णय खुप योग्य आहे. त्याच्या या निर्णयाला स्टार मराठी कडून शुभेच्छा. सुखी रहा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.