चाहूल २ मालिकेत थरारकवळण – शांभवी पोहचू शकेल का सर्जा पर्यंत !

आयुष्य संपल तरी प्रेम संपत नाही … चाहूल २

 आयुष्य संपल तरी प्रेम मरत नाही या कथासूत्रावर सुरु झालेली मालिका आता खरोखरच त्या वळणावर येऊन पोहचली आहे. शांभवी आणि सर्जा यांना असे वाटतच होते कि निर्मलाला मात देईन आता ते त्यांचा सुखाचा संसार थाटू शकतात. आता त्यांच्या प्रेमाला कोणाचीच नजर नाही लागणार, निर्मला आता त्यांच्या मार्गामध्ये कधीच येणार नाही पण आता हे सगळे शांभवी आणि सर्जावर उलटले आहे. निर्मलानानेसर्जाला कधीहिन सोडण्याचा शब्द पाळला आहे. निर्मलाने शांभवीचे रूप घेऊन तिच्या सर्जासोबत संसार सुरु केला आहे. यासाठी शांभवीच्या लुकमध्ये बदल देखील करण्यात आला आहे.पण, आता शांभवीच काय ? ती सर्जा पर्यंत कधी पोहचू शकेल का?  शांभवीला हे निर्मला आणि सर्जा कुठे आहेत याची चाहूल कधी लागेल ? हे बघण्यासाठी तुम्ही बघत रहा चाहूल २ फक्त कलर्स मराठीवर.

लग्न झाल्यानंतरशांभवीचे रूप घेऊन सर्जासोबत आपला संसार सुरु करणारी निर्मलाशांभवी कधीच सर्जा पर्यंत पोहचणार नाही याची पूर्णपणे तयारी करून खऱ्या शांभवीला दुसऱ्यामुलीचा चेहरा देऊन सर्जा सोबत दुसऱ्याच गावी निघून आली आहे. तिथे खरी शांभवी या द्विधा मनस्थितीत आहे कि आता मीच खरी शांभवी आहे हे सगळ्यांना कसे पटवून देऊ. कारण, निर्मलाने तिला कुणा दुसऱ्या मुलीचा चेहरा दिल्याने हा चेहरा कोणत्या मुलीचा आहे हे देखील शांभवीला माहिती नाही. या सगळ्या गोंधळा मध्ये शांभवीला सर्जा देखील वाचवायचे आहे. सर्जाला याची कल्पना देखील नाही कि आपल्यासोबत जी पत्नी म्हणून रहाते आहे ती शांभवी नसून निर्मलाच आहे. निर्मलामनातल्या मनात खूप खुश आहे कि, आता सर्जा माझा झाला आहे. आतात्यांच्या दोघांमध्ये कुणीच येणार नाही.

त्यामुळे खरी शांभवी कशी तिच्या सर्जा पर्यंत पोहचेल ? निर्मला शांभवीची चाहूल लागताच ती कोणत नवीन कारस्थान रचेल ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका चाहूल २ रात्री १०.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.